अमळनेर(प्रतिनिधी) खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्य़ातील प्रवाशांना सोयीची असलेली खान्देश एक्सप्रेस दररोज सुरू करण्याबाबत आमदार अनिल पाटील यांनी विधानसभाअध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. तर याबाबत गुरुवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पश्चिम रेल्वेचे व मध्य रेल्वेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांची आपल्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
खान्देश एक्स्प्रेस वेळापत्रकानुसार खान्देश एक्सप्रेस ही वांद्रे टर्मिनल ते भुसावळ जंक्शनपर्यंत मंगळवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस सुटते. तसेच भुसावळ जंक्शन ते वांद्रे टर्मिनस येथूनही मंगळवार, गुरुवार व शनिवार याप्रमाणे तीन दिवस सुटते, याबाबत जळगाव, धुळे तसेच नंदुरबार जिल्हयातून अनेक प्रवाशांनी मागणी केलेली आहे. खान्देश एक्सप्रेस ही वांद्रे टर्मिनस व भुसावळ जंक्शन येथून दररोज सुटावी जेणेकरुन सर्व सामान्य प्रवाशांना तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्हयामधून (खान्देशातून) आमदार व खासदार सुध्दा या रेल्वेने प्रवास करतात. यासाठी खान्देश एक्सप्रेस भुसावळ जंक्शन व वांद्रे टर्मिनस येथून दररोज सुटावी. जेणेकरुन सर्वसामान्य प्रवाशांना व आमदार,खासदार यांनाही या रेल्वेने येण्या जाण्यासाठी सोय उपलब्ध होईल.